रत्नागिरी : कोव्हिड महामारीमुळे आरोग्य विभागात कामाचा ताण वाढल्याने याचा परिणाम आशा आणि गटप्रवर्तक महिलांवर होत असून, त्यांच्यावर दिवसेंदिवस नवीन जबाबदाऱ्या लादल्या जात आहेत. यातून या महिलांना विविध त्रासांना सामोरे जावे लागत आहे. त्याला जबाबदार असलेल्या शासनाचा जाहीर निषेध करत आशा वर्कर्स गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी (आयटक) संघटनेतर्फे सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कॉ. शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली प्रा. शरयू पुजारी, जिल्हा प्रतिनिधी विद्या भालकर, गीतांजली भालकर, अंकिता शिंदे, मीनल चव्हाण, प्रमिला चव्हाण, समिधा राक्षे, पल्लवी पारकर, तनुजा कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने आशा व गटप्रवर्तक महिला सहभागी झाल्या होत्या.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:37 AM 03-Nov-20