रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी शहरातील आठवडा बाजार येथील हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या दोघा संशयितांना न्यायालयाने २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. खंडणी मागण्याची ही घटना शनिवारी दुपारी ३.३० वा. सुमारास घडली होती. मनोज प्रल्हाद तांडेल आणि आशिष अनिल सावंत (रा. मिऱ्या, रत्नागिरी) अशी कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात ऋषिकेश राजकुमार कुलकर्णी (२८, रा. गोळप सडा, रत्नागिरी) याने तक्रार दिली होती. या प्रकरणी तपास करताना पोलिसांनी सोमवारी संशयितांना अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:58 PM 04-Nov-20