अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात सनरायजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 6 विकेट्सने मात केली. हैदराबादने या विजयासह क्वालिफायर 2 सामन्यात धडक मारली. तर बंगळुरुचे आव्हान संपुष्टात आले. हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने एक भावूट ट्विट केलं आहे.
ट्विटमध्ये काय म्हटलंय?
विराटने बंगळुरु टीमचा सपोर्ट स्टाफसोबतचा फोटोसह ट्विट केलंय. या ट्विटमध्ये म्हटलंय ‘दु:ख आणि आनंदीही आहोत. एक टीम म्हणून आमचा या मोसमात चांगला प्रवास राहिला. या मोसमात आमच्या बाजूने काहीच गेलं नाही. मात्र तरीही मला आमच्या संघाचा अभिमान आहे, असं विराटने ट्विटमध्ये म्हटलंय. तसेच विराटने चाहत्यांचेही आभार मानले आहेत. ‘तुमच्या समर्थन आणि प्रेमासाठी मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. तुमच्या सर्वांचे प्रेम आम्हाला सामर्थ्य देतं. आपण लवकरच भेटू असं’, असंही विराटने ट्विटमध्ये म्हटलंय.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:37 PM 07-Nov-20