मुंबई : कर्नाटकमध्ये मराठा समाजासाठी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी या महामंडळाची घोषणा केली. या घोषणेनंतर भाजप नेते नितेश राणे यांनी महाविकासआघाडीवर जोरदार टीका केली आहे. कर्नाटकात मराठा समाजासाठी महामंडळाची स्थापन केली. पण महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले, असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे. ‘कर्नाटकच्या भाजपा सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली, 50 हजार कोटींची तरतूद पण केली!!! आणि इथे महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले..म्हणून पाहिजे परत एकदा.. फडणवीस सरकार!!!’ असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:32 PM 16-Nov-20