केवळ लसीच्या बळावर कोरोनावर मात करणं शक्य नाही; डब्ल्यूएचओच्या प्रमुखांचा दावा

0

नवी दिल्ली : संपूर्ण जगाला वेढा घातलेल्या कोरोना महामारीवर मात करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ज्ञ प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. भारतातही या लस निर्मितीबाबत वेगात संशोधन सुरु आहे. पण अशा स्थितीत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुथ ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. एकट्या लसीच्या बळावर आपण कोरोनासारख्या महामारीला रोखू शकत नाही, असं घेब्रेसस यांनी म्हटलं आहे. ‘कोरोनावर मात करण्यासाठी अन्य उपाय किंवा साधनांसोबतच लस हे एक पुरक साधन असू शकेल. मात्र केवळ लस ही कोरोनाची महामारी संपवू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला कोरोनाच्या चाचण्या, ट्रेसिंग, रुग्णांचं विलगीकरण आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे गरजेचं आहे’, असं WHOच्या प्रमुखांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:58 AM 17-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here