गुहागर : तालुक्यातील वेलदूर येथे ७.३० कोटी रुपये खर्चुन बांधण्यात येत असलेल्या पर्यटन जेटीमुळे स्थानिक मच्छीमारांना त्यांच्या बोटी, होड्या किनाऱ्यावर आणणे अडचणीचे ठरणार होते. यावर आमदार भास्कर जाधव यांनी संबंधित सर्व खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून प्रत्यक्ष पाहणी केली आणि स्थानिक मच्छीमारांना सोयीचे होईल अशाप्रकारे काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. त्यामुळे मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:05 PM 20-Nov-20