रत्नागिरी : पुरात अथवा अतीवृष्टीने वाहून गेलेल्या शेतीउपयुक्त जनावरांसाठी प्रत्येकी ३० हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. अशा पशुधनाचे मालक असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी तलाठी, पोलिस पाटील, सरपंच, ग्राम पातळीवरील सहकारी दूध संघाचे संचालक व संबंधित पशधनाचे मालक यांनी स्वाक्षरी केलेला स्थानीय पंचनामा. मदतीसाठी ग्राह्य घरण्यात येणार आहे. नुकसान झालेल्या जनावरांच्या गोठ्यांसाठीही मदत करण्यात येत आहे. असा गोठा घराला जोडून असला किंवा शेतात असला तरीही आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार २,१०० रुपये प्रती गोठा मदत देण्यात यणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात जले ते जग्सट यआ कालावधीत झालेल्या अतीवृष्टीमुळे पाच वेळा पुरसथिती निर्माण झाली होती. अशा पूरस्थितीत संभधित शेतखऱ्यांनी अथवा जनावरांच्या मालकांनी पंचायत समिती स्तरावर कृषी विभागाकडे प्रस्तावसादर करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
