रत्नागिरी : हातखंबा गावातील पुलावर भीषण अपघात झाला असून साखर वाहतूक करणाऱ्या वाहनाने तब्बल चार वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात 6 जण जखमी तर एकजण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. अपघात घडताच या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पाटील पोहचले व त्यांनी जखमींना आपल्या गाडीने तात्काळ इस्पितळात पोहचवले. अपघात इतका भीषण होता की एका अपघातग्रस्ताच्या पायाचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला मुन्ना देसाई आणि सहकाऱ्यानी पकडून पोलिसांच्या हवाली केले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
1:54 PM 22-Nov-20