खेड : मराठा आरक्षण स्थगितीचा फटका वैद्यकीय प्रवेशावर झाला आहे. आर्थिक मागास दुर्बल घटकासाठी असलेले केंद्राचे आरक्षण राज्य सरकारकडून मिळावे ही मागणी आहे. जर हे आरक्षण दिलं असतं तर मराठा समाजाची जवळपास ६०० पेक्षा जास्त मुल वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहिली नसती. सरकारची निष्क्रियता आणि सरकारमधील काही मराठा समाजाचे मंत्री यांच्यामुळे ही वेळ आल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला. ते खेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संघटनेचे सरचिटणीस विक्रांत आंब्रे उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:53 PM 23-Nov-20