रत्नागिरी : जिल्ह्यातील तमाम शेतकरी, मजूर तसेच छोटे-मोठे व्यावसायिक यांना कोरोना टाळेबंदी काळातील वीज बिल माफी मिळाली पाहिजे या प्रमुख मागणीकरिता मनसेच्या वतीने अनेक आंदोलने झाली आहेत. मात्र, अद्यापही महावितरणकडून याबाबत कार्यवाही झालेली नाही. यामुळे मनसेतर्फे दि. २६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. वाढीव वीज बिल रद्द करावे या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाची दखल घेत राज ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले आहे. सामजिक संघटना, संस्था, प्रतिष्ठान, संघ, महिला संघटना, बचतगट, हॉटेल, व्यावसायिक, दुकानदार, रिक्षा संघटना यांसह सर्व वीजग्राहकांनी दि. २६ रोजी सकाळी ११.०० वाजता मारुती मंदिर सर्कल येथे मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:57 PM 25-Nov-20