रत्नागिरी : शहरातील आलीमवाडी येथे पाण्याच्या टाकीसाठी चार गुंठे जागा जादा दराने खरेदी करण्याच्या विषयावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. जनतेचा सार्वजनिक पैसा फुकट कोणाला दिला जाऊ नये. सत्ताधार्यांनी यात दिशाभूल केल्याचे भाजपच्या कायदा आघाडीने सांगितले. बैठकीत होणार्या जमीन संपादनात महामार्गाच्या जमिनीप्रमाणे मोबदल्याची तरतूद वापरणे चुकीचे आहे. त्यामुळे हा व्यवहार संशयास्पद आहे. उद्याच्या पालिका सर्वसाधारण बैठकीमध्ये दरनिश्चितीचा ठराव फेटाळून लावावा किंवा रेडीरेकनरनुसार दर निश्चित करावा किंवा शासनाच्या मोफत मिळणार्या जमिनीवर टाकी बांधावी, असे स्पष्ट मत विधी आघाडीने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
06:07 PM 25/Nov/2020