रत्नागिरी : भाजपच्या जिल्हा संपर्क कार्यालयात आज पत्रकार परिषद घेण्यात आली. आलीमावाडी येथील टाकीच्या वादावरून आता भाजपच्या कायदा आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. बाबा परुळेकर म्हणाले कि १७ लाखाची जमिन १ कोटी २७ लाख रुपयांना खरेदी केली जात आहे. पाणी योजना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली. नंतर सत्ताधार्यांनी पुढील योजनेसाठी तांत्रिक मान्यता, टाकी बांधण्यासाठी सीआरझेड परवानगी, जागेची उपलब्धता मान्यता घ्यायला हवी होती. आलीमवाडीत जागा घेतल्यानंतर नळ पाईपलाईसाठी अजून तीन कोटी रुपये लागणार आहेत, हे पैसे कुठून आणणार? जनतेच्या पैशांचा अपव्यय केला जाऊ नये यासाठी भाजपचा विरोध आहे असे मत भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. बाबा परुळेकर यांनी व्यक्त केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
06:18 PM 25/Nov/2020