रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पुढील पाच वर्षे सांभाळावा. त्यांच्या पाठीशी शिवसेना कायम उभी राहील. हे माझे वैयक्तिक मत नव्हे तर शिवसेनेचे आहे. जिल्हा सहकारी बँकेत राजकारण करुन त्या संस्थेची वाट लागण्यापेक्षा सकारात्मकतेने तीचे वलय चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करुया, असे सांगत राज्यात असलेली महाविकास आघाडी बँकेच्या निवडणुकीत कायम ठेवण्याचा सुतोवाच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केला. आरडीसीसी बँकेने सुरु केलेल्या मोबाईल एटीएम व्हॅनच्या उद्घाटनप्रसंगी श्री. सामंत बोलत होते. या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे, जि.प. अध्यक्ष रोहन बने, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, कार्यकारी संचालक सुनिल गुरव यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:19 PM 26-Nov-20