मुंबई : वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आज राज्यभरात रस्त्यावर उतरले आहेत. सर्वसामान्यांना आलेली वाढीव वीज बिलं माफ करावीत, अशी मनसेची मागणी आहे. मुंबईतील सभेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकारला थेट इशाराच दिला. ‘स्वत:ला ठाकरे सरकार म्हणवून घेत असाल तर त्या सरकारवरचा लोकांचा विश्वास उडू देऊ नका. नाहीतर दुसरे ठाकरे आहेतच हे लक्षात ठेवा. लवकरात लवकर निर्णय घ्या,’ असं नांदगावकर यांनी ठणकावलं.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:39 PM 26-Nov-20