मुंबई : मुंबई येथील वादग्रस्त कांजुरमार्ग मेट्रो कारशेडचा वाद आता उच्च न्यायालयात गेला आहे. कुलाबा ते सीप्झ (मेट्रो-3) या प्रकल्पासाठी पूर्वी आरे येथे नियोजित असलेलं हे कारशेड कांजुरमार्ग येथे हलवण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. पण केंद्र सरकारने याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. कांजुरमार्गची प्रस्तावित जागा MMRDA ला देण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतरिम आदेशाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केंद्राने न्यायालयात केली. याप्रकरणी पुढीत आठवड्यात सुनावणी होणार असून त्यावेळी युक्तिवाद केला जाणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:56 AM 28-Nov-20