देवरूख : नेत्रावती एक्सप्रेस व मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी संगमेश्वर स्टेशनला थांबा मिळावा, यासाठी निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर या फेसबुक ग्रुपतर्फे मागणी करण्यात आली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व निर्णय शिथिल होत आहेत. रेल्वे प्रशासनाने स्थानिक रहिवाशी आणि मुंबईहून प्रवास करणाऱ्या सर्व चाकरमानी यांच्या मागणीचा लवकरात लवकर विचार करावा. अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा इशारा फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन आणि सभासदांनी दिला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:42 PM 30-Nov-20