कोलकाता : पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तयारी आतापासूनच सुरुवात झाली असून पश्चिम बंगालमध्ये सध्या फोडाफोडीच्या आणि पक्षांतराच्या राजकारणाला जोर आला आहे. राज्यात गेल्या दहा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या ममत बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले असून, पक्षाला काही बड्या नेत्यांसह अनेक आमदार सोडचिठ्ठी देत आहेत. त्यातच आता ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाबतही अनेक दावे केले जात आहेत. आमच्या संपर्कात तृणमूल काँग्रेसचे ६२ आमदार असून, ममता सरकार येत्या १५ डिसेंबरपर्यंत पडणार असल्याचा दावा भाजपाचे खासदार सौमित्र खान यांनी केला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:42 PM 30-Nov-20