पुणे : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 2 डिसेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. ते त्यावेळी काही बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे स्वागत आहे. पण त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी बॉलिवूडला मुंबईपासून वेगळे केले जाणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. दुधात साखर विरघळल्यासारखे मुंबई आणि बॉलिवूडचे नाते असल्यामुळे कितीही प्रयत्न केले, तरी बॉलिवूड वेगळे केले जाणार नसल्याचे सुळे यांनी सांगितले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:33 AM 01-Dec-20