देवेंद्र फडणवीस सरकारने काम न करताच १० हजार कोटींची खिरापत ठेकेदारांना वाटली : खा. विनायक राऊत

0

◼️ “देवेंद्र सरकारने हायब्रीड अॅन्युइटी अंतर्गत केलेला मोठा घोटाळा बाहेर पडणार”

रत्नागिरी : देवेंद्र फडणवीस सरकारचे घोटाळे आता बाहेर पडू लागले आहेत. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी आता सुरु झाली आहे. येत्या दोन दिवसात देवेंद्र फडणवीस सरकारने केलेले हायब्रीड अॅन्युइटी अंतर्गत केलेला मोठा घोटाळा बाहेर पडणार असल्याची माहिती खा. विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. ते म्हणाले कि रस्ते तयार करण्याची केंद्राची हि योजना उलटी फिरवून ६०/४० करून सुमारे ३२ हजार ७२४ कोटी इतका रस्त्यांचा प्रस्ताव बनवला आणि नागपूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे येथील ठेकेदारांना काम ण करताच १० हजार कोटींची खिरापत वाटल्याचा गंभीर आरोप खा. विनायक राऊत यांनी केला आहे. बोगस ठेकेदार, एका सदनिकेत ५ कंपन्यांचे रजिस्ट्रेशन, वर्क ऑर्डर देण्याआधीच आदल्या दिवशी पेमेंट करण्यात आले. या सर्व घोटाळ्यांचे पुरावे आम्ही जनतेसमोर आणणार आहोत. हायब्रीड अॅन्युइटी अंतर्गत सुमारे ९८ टक्के पेमेंट काम ण करताच दिल्याचा आरोप देखील विनायक राऊत यांनी केला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:15 AM 02/Dec/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here