मुंबई : महाविकास आघाडी धुळे-नंदुरबार पदवीधर मतदार संघात आपली 50 टक्के मतेही राखू शकली नाही. यावरून महाविकास आघाडी सरकारचे उद्याचे भवितव्य काय राहील, हेच स्पष्ट होत असल्याची खोचक प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. धुळे नंदुरबारमधील काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या अमरीश पटेल यांच्या विजयाने विजयाची श्रृंखला सुरू झाली आहे. भाजप विधानपरिषदेच्या 6 पैकी 6 जागा जिंकणार, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यातील जनता तिन्ही पक्षी एकत्र येऊनही भाजपच्या मागेच असल्याचे सिद्ध झाल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:57 PM 03-Dec-20