मुंबई : महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती झाली. अनेक संकटांमधून मार्ग काढत हा जगन्नाथाचा रथ यशस्वीपणे पुढे घेऊन जाण्याचे काम आपण सर्वांनी केले आहे. शेती आणि शेतकरी संकटात होता, कोरोनाशी लढा सुरू आहे. पण मागील ५० वर्षांमध्ये मी असे कधी पाहिले नाही की, एक वर्ष पूर्ण होताच सरकारच्या कामगिरीची चिकित्सा सुरू झाली आहे. हे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल एवढा कद्रूपणा का करायचा, हे सरकार पुढची पंचवीसच काय तर अनेक वर्षे चालेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. ते गुरुवारी मुंबईत महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:09 AM 04-Dec-20