रत्नागिरी : शहराच्या प्रस्तावित नळ पाणी योजनेतील टाकीसाठी घेण्यात येणाऱ्या आलीमवाडी येथील जागेच्या प्रश्नावरून आता राष्ट्रवादी शहर अध्यक्ष निलेश भोसले यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सदर जागेचा व्यवहार चुकीच्या पद्धतीने झाला असून जनतेचा कररूपी पैशाचा अपव्यय आहे, असा आरोप निलेश भोसले यांनी केला आहे. मात्र उच्च न्यायालयात मागितलेली दाद ही केवळ एक सामान्य नागरिक म्हणून असून राष्ट्रवादी पक्षाचा शहर अध्यक्ष म्हणून नाही असा खुलासा देखील निलेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
1:17 PM 04-Dec-20