रत्नागिरी : सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली, अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्यरेषेखालील मुलगे यांना दरवर्षी मोफत दोन गणवेश देण्यात येतात. यावर्षी मात्र शासनाने एकच गणवेश देण्याचे निश्चित केले आहे. शासनाने एकाच गणवेशासाठी निधी दिला असला, तरी तो अपुरा असल्याने शिक्षण विभागाने आवश्यक निधीची मागणी केली आहे. जिल्ह्यात एकूण ५५ हजार ८७७ विद्यार्थी असून, त्यांच्यासाठी एका गणवेशाकरिता एक कोटी ६७ लाख ६३ हजार रूपयांची आवश्यकता आहे. मात्र, राज्य शासनाकडून एक कोटी ३६ लाख ७३ हजार रूपये निधी प्राप्त झाला आहे. अद्याप गणवेशासाठी ३० लाख ९० हजार रूपयांचा निधी आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईकडे शिक्षण विभागातर्फे पत्र पाठवून निधीची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत निधी प्राप्त होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना नवीन गणवेशासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:07 PM 07-Dec-20