मुंबई : भारत बंदला पंजाब हरयाणा वगळता देशात कुठेही प्रतिसाद मिळणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही केंद्र सरकारची भूमिका आहे. त्यासाठी शेतकरी संघटनांशी चर्चा होत असुन यावर सकारात्मक तोडगा निघेल. कायद्यात सुधारणा होईल मात्र सर्व कायदाच रद्द करण्याची टोकाची भूमिका शेतकरी संघटनांनी घेणे योग्य नाही. शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:09 AM 08-Dec-20