राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

0

जालना : राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचं आवाहन त्यांनी केले आहे. येत्या 12 डिसेंबरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तरूण वर्गानं रक्तदान करण्याचं आवाहन टोपे यांनी या वेळी केलं. दरम्यान, कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:45 PM 08-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here