रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जारी झालेल्या लॉकडाउनमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पासपोर्ट कार्यालय बंद करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग कमी होताच इतर ठिकाणची पासपोर्ट कार्यालये सुरू झाली असली, तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी उपयुक्त असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील पासपोर्ट कार्यालय अजून सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
करोनाच्या काळात वाढते संक्रमण रोखण्यासी शासनाने लॉकडाउन जारी केले. त्यामध्ये काही शासकीय कार्यालयेही बंद करण्यात आली होती. त्यात राजापूरच्या पोस्ट कार्यालयात सुरू केलेल्या पासपोर्ट कार्यालयाचाही समावेश होता. आता लॉकडाउन शिथिल केल्यानंतर अनेक शासकीय आणि खासगी कार्यालये सुरू झाली आहेत. मात्र पासपोर्ट कार्यालय अद्यापही सुरू झालेले नाही. परदेशप्रवासासाठी आवश्यक असलेला पासपोर्ट काढण्याची सुविधा कोकणातील लोकांना स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावी, म्हणून दोन वर्षांपूर्वी राजापूर येथे पासपोर्ट कार्यालय सुरू झाले. त्यामुळे कोकणातील हजारो लोकांना त्याचा फायदा झाला. इतर जिल्ह्यांमधील पासपोर्ट कार्यालये सुरू झाली असली, तरी रत्नागिरीतील कार्यालय अजूनही सुरू झालेले नाही. त्यामुळे नव्याने पासपोर्ट काढणाऱ्यांसह ज्यांच्या पासपोर्टची वैधता संपल्याने नूतनीकरण करावयाचे आहे, अशा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यांना तूर्त तरी वेळ आणि पैसा खर्च करून मुंबईला जावे लागत आहे. करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:10 AM 10-Dec-20