पुणे : जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सोमवती यात्रेनिमित्त जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 12 ते 14 डिसेंबरपर्यंत भाविकांना जेजुरीत प्रवेश दिला जाणार नाही. 12 ते 14 डिसेंबरपर्यंत खंडोबा गडाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात येणार आहेत. तसेच मंगळवारनंतर पुन्हा खंडोबा गडावर भाविक जाऊ शकतील असल्याची माहिती जेजुरीचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:03 PM 11-Dec-20