रत्नागिरी : जिल्ह्यात एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या आणि लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या ४७९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाली आहे. ग्रामपंचायतींसाठी दि. १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार असून १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, इच्छुकांच्या व राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड १५, दापोली ५७, खेड ८७, चिपळूण ८३, गुहागर २९, संगमेश्वर ८१, रत्नागिरी ५३, लांजा२३ तर राजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:27 AM 12-Dec-20