रत्नागिरी : राजापूर येथील नवोदय विद्यालयातील प्रवेश प्रक्रियेत होणारी बनवेगीरी रोखण्यासाठी तसेच तेथे स्थानिक मुलांना प्रवेश मिळावा या उद्देशाने जिल्हा परिषदेकडूनही कडक पावले उचलण्यात येणार आहेत. फक्त नवोदयमधील प्रवेशासाठी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत प्रवेश दिल्याचे उघड झाल्यास संबंधितांवर कारवाई बडगा उगारला जाईल अशी भुमिका जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी घेतली आहे. आता जि. प. अध्यक्ष बने यांनी जिल्ह्यातील स्थानिक विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. नवोदय प्रवेशासाठी जिल्ह्यातील शाळांत प्रवेश घेतल्याबाबत तपासणी करण्याच्या सुचनाही शिक्षण विभागाला दिलेल्या आहेत. नवोदय विद्यालयात सहावीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या रहिवाशी दाखल्याच्या चौकशीचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून दिले आहेत. आधार कार्डावरुन याची माहिती पुढे येऊ शकते. नवोदयमधील प्रवेशात स्थानिकांना न्याय मिळावा यासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ठराव करण्यात येणार असल्याचे श्री. बने यांनी सांगितले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:05 AM 14-Dec-20