रत्नागिरी : कोरोना काळात काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कायम स्वरूपी थेट सेवा भरती करून त्या त्या उमेदवारांना त्या-त्या जिल्ह्यात नेमणूक द्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र समविचारी मंचच्या राज्यस्तरीय आंदोलनाची सुरुवात रत्नागिरीतून होणार आहे. सोमवार, दि. १४ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. याच दिवशी संपूर्ण राज्यातील महाराष्ट्र समविचारी मंचचे पदाधिकारी आपआपल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणीची सुरुवात करून संभाव्य लढ्याला सुरुवात करणार आहेत. तरी समविचारीने पुकारलेल्या या एक दिवशीय उपोषणात बहुसंख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन समविचारी मंचचे बाबासाहेब ढोल्ये, राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, महासचिव श्रीनिवास दळवी, जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर, युवा प्रमुख अॅड. नीलेश आखाडे, तालुकाध्यक्ष डॉ. सुजय लेले, साधना भावे आदींनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:57 AM 14-Dec-20