मुंबई : कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी अखेर बेस्ट वर्कर्स युनियनने 9 ऑक्टोबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तशी नोटीसच गुरूवारी युनियनमार्फत महाव्यवस्थापकांना पाठवण्यात आली. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये बेस्ट संपावर तोडगा कोणी काढायचा असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे या संपाचा थेट फटका बसने दररोज प्रवास करणार्या 30 लाख प्रवाशांना बसणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
