खरवते येथे आंब्याच्या बागांना आग, 25 लाखांचे नूकसान

0

रत्नागिरी : खरवते येथे आंब्याच्या बागेला दि. 9 डिसेंबरला सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. यात एकूण 250 कलमांचे नूकसान झाले पैकी 165 कलमे ही मोहरून कणि, कैरि अवस्थेमध्ये होती. या आगीमुळे अनिकेत हर्षे यांचे सुमारे 25 लाख रूपयांचे नूकसान झाले. अनिकेत हर्षे यांचा बरोबर प्रसाद लोगडे, रजनिश महागावकर, भांबूरे, तोडणकर, नारवेकर अशा लोकांचा बागा जळाल्या. यात प्रसाद लोगडे यांच्या बागेचेसुद्धा मोठे नूकसान झाले आहे. घटनास्थळी गावचे पोलिस पाटिल गणेश आरेकर, तलाठी संदे, कृशिसहायक भूवड उपस्थित होते. त्यांनी पंचनामा केला. तसेच खरवते गावचे पोलिस पाटिल संतोष सकपाळ, धामणसे तलाठी शिवलकर मॅडम उपस्थित होत्या. आग ही शाॅर्ट सर्किटमूळे लागल्याचे सांगण्यात येत आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:36 PM 14-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here