‘आंबा बागायतदारांना सरसकट कर्जमाफी द्यावी’

0

रत्नागिरी : कोरोनापाठोपाठ आलेले निसर्ग वादळ, लांबलेला पाऊस यामुळे आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामधून बाहेर काढण्यासाठी सरसकट कर्जमाफी, कर्जावरील व्याजामध्ये सूट, आयकरात शिथिलता मिळावी अशी मागणी शासनाकडे करण्याचा निर्धार आंबा बागायतदारांनी केला. रत्नागिरीतील अंबर मंगल कार्यालयात झालेल्या आंबा उत्पादक संघाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, काका मुळ्ये, तुकाराम घवाळी, बावा साळवी, सतीश शेवडे, राजेंद्र कदम आदी बागायतदार उपस्थित होते. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळ भेटणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:06 PM 14-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here