मुंबई : राज्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आपृतीने आपृतीबंध निश्चित न करता शिक्षण विभागाने 11 डिसेंबर रोजी ठोक मानधनावर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना नेमण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याने हा बेकायदेशीर अध्यादेश रद्द करावा यासाठी शिक्षक भारतीने राज्यभरात सोमवारी आंदोलन केले. तर या अध्यादेशाविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शाळा, कॉलेज 18 डिसेंबर रोजी बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या बंदला शिक्षक भारतीनेही पाठिंबा दिला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:36 AM 15-Dec-20