मुंबई : कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने MMRDA ला आज दिले आहेत. कांजूर मार्ग मेट्रो कार शेड चे काम ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे भारतीय जनता पार्टी आणि राज्य सरकारमध्ये कलगीतुरा रंगलेला असतानाच वंचित बहुजन आघाडीने देखील यामध्ये आता उडी घेतलेली आहे. कांजूर मार्ग मेट्रो कारशेड हा विषय राजकीय आहे. त्यामुळे कांजूर मार्ग प्रकरणात कोर्टाने या मध्ये पडू नये अशी विनंती वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. कांजूर मार्ग ही केंद्राची जागा नाही, ती मुंबई इलाक्याची जागा आहे, त्या मुळे ती राज्याची जागा आहे. असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:29 PM 16-Dec-20