राजापूर : कोदवली येथील जिजामाता व सावित्री महिला बचत गटाच्या महिलांनी वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक बनलेल्या रस्त्यावरील खड्डे श्रमदानासह स्वखर्चातून बुजविले. कोदवली गावातील मुख्य रस्ता ते अध्यापक महाविद्यालय यादरम्यानच्या रस्त्याची पार दुरवस्था झाली होती. रस्त्यावरील डांबर व खडी उखडून गेल्याने रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरून गावात वाहन नेताना कसरत करावी लागत होती. रस्ता दुरुस्त करण्यासाठी स्थानिक प्रशासन वा शासनाकडून निधी उपलब्ध होईल, याची वाट न पाहता गावातील जिजामाता आणि सावित्री महिला बचत गटांमधील महिलांनी रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात माती टाकून खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणारी माती महिलांनी स्वखर्चाने आणून श्रमदानाने या रस्त्यातील खड्डे बुजविले. आता हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत झाला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:04 PM 19-Dec-20