‘महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी ही माझी इच्छाच’ : फडणवीस

0

मुंबई : आगामी निवडणुका महाविकास आघाडातील तिन्ही पक्ष एकत्र लढवतील, अशी चर्चा आहे. पण मी म्हणेन त्यांनी नक्कीच एकत्र निवडणूक लढवली पाहिजे, तशी माझी तर इच्छाच असल्याचे वक्तव्य विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच, भाजपमध्ये आगामी काळात अनेकांचा प्रवेश होणार असून कुणीही भाजप सोडून जाणार नाही. त्याचबरोबर उगाचच काहीजण वावड्या उठवत असल्याचे म्हणत यावेळी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर फडणवीस यांनी निशाणा साधल्याचेही दिसून आले. शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करत आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:00 PM 21-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here