मुंबई : 2020 या वर्षातील जवळपास सर्वच सण कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणाने साजरा करण्यात आले. आता अवघ्या दोन दिवसांवर येऊ घातलेल्या नाताळ या सणाच्या निमित्तानेही राज्य सरकारने जनतेला आवाहन केले आहे. सर्व ख्रिस्त धर्मीयांना यंदाचा नाताळ सण हा अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आवाहन केले आहे. महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती मिळताच आतापासूनच सावधगिरीची पावले उचलली जात आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यूचे हे नियम लागू असतील. शिवाय नाताळ सण साजरा करण्यासाठीही ठराविक नियमांचे सर्वांना पालन करावे लागणार आहे. नाताळ सणासाठी आखून दिलेल्या या नियमावलीचे पालन करत नागरिकांनी प्रशासनाला मदत करत कोरोना नियंत्रणात ठेवण्याच्या या युद्धात हातभार लावावा, असे जाहीर आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:47 AM 23-Dec-20