मुंबई : देशातला शेतकरी गेल्या एक महिन्यापासून देशात नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्राला निशाणा करत टोला लगावला आहे. महाराष्ट्रासह मुंबईतही शेतकऱ्यांची आंदोलने झाली. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी तीन काळ्या विधेयकाच्या विरोधात एक महिन्यापासून दिल्लीच्या थंडीत आंदोलन करत आहे. सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही आणि कुटुंबाचीही चिंता नाही. आतापर्यंत १२ शेतकऱ्यांचा आंदोलनाचा ठिकाणी मृत्यू झाला. तर एका संताने आत्महत्या केली आहे. आजचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी काळा दिवस असल्याची टीका संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:47 PM 23-Dec-20