कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय : संजय राऊत

0

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कालपासून ईडीचे कोणीच आले नाही असं सांगितले. राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्याप्रकरणी ते बोलत होते. संजय राऊत यांनी यावेळी बोलताना भाजपला टोला लगावला आहे. आता मी माझा माणुस पाठवला आहे भाजपच्या आँफिसमध्ये पाठवला आहे, असा टोला संजय राऊत यांनी लागवला आहे. हे सर्व राजकारण ज्यांना करायचं आहे त्यांना करुद्या, असंही ते म्हणाले. ईडीची नोटीस याबद्दल शिवसेना भवनात दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत सविस्तर बोलणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:02 AM 28-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here