राजापूर : सुमारे तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या रिफायनरी प्रकल्पातून लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. अन् कोट्यवधींची उलाढाल होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प स्थानिकांना हवा असून त्यातून प्रकल्प समर्थन वाढू लागले आहे. येत्या पंधरा दिवसांत लोकप्रतिनिधींनी प्रकल्प समर्थकांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून द्यावी. अन्यथा प्रकल्प समर्थकांचा उद्रेक होऊन ते रस्त्यावर उतरतील, असा इशारा रिफायनरी प्रकल्प समर्थक कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर आणि सचिव अविनाश महाजन यांनी दिला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:24 PM 28-Dec-20