रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील निवळी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला आहे. दल बहादूर मेघी भंडारी, वय ५५ रा. नेपाळ असे या इसमाचे नाव आहे. हा इसम आज सकाळी ६.३० च्या सुमारास आपल्या कुटुंबासहित चालत रत्नागिरीच्या दिशेने येत असतना एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. हि धडक इतकी जबरदस्त होती कि हा इसम जागीच गतप्राण झाला. घाटात दाट धुके असल्याने हे अज्ञात वाहन धुक्यात पसार झाले. निवळी गावातील तरुण राहुल डांगे, कुणाल सावंत, राज डांगे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना मदत करीत रुग्णवाहिकेतून मयत इसमाचे शव जिल्हा रुग्णालयात पाठवून दिले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:16 AM 30/Dec/2020