ठाकरे सरकारच्या कारभाराला कंटाळून पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी प्रतिनियुक्ती स्वीकारली : फडणवीस

0

मुंबई : महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयसवाल यांच्या बदलीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारच्या कारभाराला कंटाळून सुबोध जयसवाल यांनी प्रतिनियुक्ती स्वीकारली असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने तसे आदेश बुधवारी रात्री उशीरा काढले आहेत. सुबोध जयस्वाल यांनी राज्य सरकारकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून मुक्त करण्याची विनंती केली होती. तसेच केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर जाण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली होती. “पोलीस हा स्वतंत्र विभाग आहे. तो जरी गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येत असला तरी एक स्वायत्ता आपण त्यासाठी दिली आहे. गृहमंत्र्यांचं, गृहमंत्रालयाचं आणि मुख्यमंत्र्यांचं पर्यवेक्षी असं काम आहे. परंतु सध्या छोट्यातल्या छोट्या अशा प्रत्येक ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारचा हस्तक्षेप चालला आहे. त्यामुळे अशाप्रकारचा निर्णय डीजींनी घेतला. मला वाटतं पहिल्यांदा अशाप्रकारे अशी परिस्थिती आली आहे की, सरकारच्या कारभाराला कंटाळून डीजी प्रतिनियुक्तीवर चालले आहेत. मला वाटतं हे महाराष्ट्रासाठी भूषणावह गोष्टी नाही आहे, ” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:20 AM 31-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here