रत्नागिरी : कोरोना काळात जिल्ह्यात ४ हजार ४१ बेरोजगारांची नावनोंदणी केली आहे. रोजगार मिळवून देणाऱ्या सेवायोजना कार्यालयाचे नाव तिसऱ्यांदा बदलून आता कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासातून तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला. त्यामुळे ज्यांच्यात कुठल्याही व्यवसायाचे कौशल्य नाही किंवा अपुऱ्या प्रमाणात आहे, अशांना विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य वाढवून रोजगार संधी मिळवून दिली जात आहे; मात्र अलीकडे बेरोजगारांची संख्या वाढली असून कोरोना काळात चार हजार ४१ जणांनी नावनोंदणी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:14 PM 31-Dec-20