जिल्ह्यात नववर्ष स्वागताला नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५०१ जणांवर पोलिसांची कारवाई

0

रत्नागिरी : सरत्या वर्षाचा निरोप देताना व नवीन वर्षाचे स्वागत करताना राज्य सरकारने लागू केलेल्या नियामंचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून जिल्हाभरात पोलीस तैनात झाले होते. प्रत्येक ठिकाणी वाहनांची काटेकोर तपासणी केली जात होती. या दरम्यान ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात १५८ केसेस करण्यात आल्या तर वाहतूक शाखेने ६२ केसेस केल्या. १२ वाजल्यापासून ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात १८७ केसेस करण्यात आल्या तर वाहतूक शाखेने ९४ केसेस केल्या. यामध्ये ट्रिपलसीट, लायसन्स नसणे, हेल्मेट नसणे, सीट बेल्ट ण लावणे, लायसन्स आदी नियामंचे उलंघन करणाऱ्यांवर हि कारवाई करण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
01:20 PM 01/Jan/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here