मुंबई : देशातील काही राज्यात बर्ड फ्लूचा धोका पसरला आहे. महाराष्ट्रात हा संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारने आतापासूनच पावले उचलायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात या रोगाचा शिरकाव रोखण्यासाठी गुजरात आणि मध्य प्रदेशातील कोंबडय़ांची आवक थांबवण्यात आल्याची माहिती पशूसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी दिली. महाराष्ट्राला तूर्तास बर्ड फ्लूचा धोका नाही. मात्र परराज्यातून संसर्ग होऊ नये यासाठी सीमेवर तपासणी नाक्यांवर अधिक दक्षता बाळगण्यात येतेय. शिवाय पोल्ट्री व्यावसायिकांनी देखील योग्य काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:12 AM 09-Jan-21