रत्नागिरी : राजापुरातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाच्या विषयावर पालकमंत्री तथा शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी सावध भूमिका घेत प्रश्नालाच बगल दिली. शिवसेनेचे धोरण ठरवण्याचा अधिकार आणि अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहेत असे सांगत पालकमंत्र्यांनी बचावात्मक भूमिका घेतली. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेच्या आणि पक्षहिताचा विचार करून भूमिका मांडतात. याबाबतीतही तेच अधिकृत भूमिका मांडतील, असेही पालकमंत्री परब यावेळी म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:07 AM 13-Jan-21