राजापूर : पावसामध्ये दरवर्षी अर्जुना आणि कोदवली नद्यांना वेळा पूर येतो. त्यामुळे पुराच्या पाण्याच्या वेढ्याने नागरिकांची गैरसोय होते. ही गोष्ट लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नैसर्गिक आपत्तीअंतर्गत राजापूर नगर परिषदेला फायबर बोट उपलब्ध करून दिली. अर्जुना आणि कोदवली नद्यांना पावसात पूर आल्यावर पुराच्या वेढ्यामुळे निर्माण होणाऱ्या आपत्काळामध्ये लोकांना सुरक्षित ठिकाणी पोचविण्यासाठी फायबर बोट मिळावी, अशी मागणी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने नैसर्गिक आपत्तीअंतर्गत पालिकेला फायबर बोट उपलब्ध केली. त्यामुळे पूरस्थितीत अडकलेल्या राजापूरवासीयांना सुरक्षितस्थळी पोचणे सुलभ होणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:25 PM 13-Jan-21