रत्नागिरी : जिल्ह्यात ३६० ग्रामपंचायतींसाठी आज (दि. १५) रोजी निवडणूक होत असून जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. ९१४ प्रभागांमधून २००९ उमेदवारांसाठी जिल्ह्यातील ४ लाख ५९ हजार १२१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गुरुवारी मतदान केंद्रांवर एस.टी. व खासगी वाहनांच्या मदतीने निवडणूक यंत्र, केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी रवाना झाले आहेत. पोलिस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला असून संवेदनशील भागांवर अधिक लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण ४७९ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. त्यापैकी ११९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ३६० ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:09 AM 15-Jan-21