रत्नागिरी : शहराबाहेरच्या भागात अॅग्रीकल्चर झोन जाहीर झाल्याने रत्नागिरी नगर परिषदेची रखडलेली हद्दवाढ दृष्टीक्षेपात येऊ लागली आहे. ही हद्दवाढ झाल्यावर क वर्गातील रत्नागिरी महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकणार आहे. सुमारे ८ वर्षांपूर्वी हा हद्दवाढीचा प्रस्ताव तत्कालीन नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी सविस्तरपणे शासनाकडे सादर केला होता. बुधवारी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना रनपला भेट देऊन मुख्याधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनीही याच हद्दवाढीच्या प्रस्तावाबाबत विचारणा केली. त्यामुळे आता हद्दवाढीच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:18 AM 15-Jan-21